Fiverr

Tuesday, December 10, 2024

Government employees will get 26 public holidays in the new year.

 नवीन वर्षात मिळणार शासकीय कर्मचाऱ्यांना 26 सार्वजनिक सुट्ट्या....


2025 साली महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना 26 सार्वजनिक सुट्ट्या मिळतील. प्रमुख सुट्ट्यांमध्ये 26 जानेवारी (प्रजासत्ताक दिन), 19 फेब्रुवारी (शिवाजी महाराज जयंती), 31 मार्च (रमजान ईद), 15 ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन), 2 ऑक्टोबर (गांधी जयंती) आणि 25 डिसेंबर (ख्रिसमस) यांसारख्या दिवशी सुट्टी राहील. याशिवाय, महाशिवरात्री, होळी, गुढीपाडवा, गणेश चतुर्थी, दिवाळी, बकरी ईद आणि अन्य सणांच्या पार्श्वभूमीवर सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत.


ऑनलाइन जॉब शोधण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स..



आजकाल नोकऱ्या शोधताना ऑनलाइनवरच अधिक भर दिला जातो. ऑनलाइन नोकरी शोधताना पुढील गोष्टी उपयोगी ठरतात. आपला बायोडाटा (CV) आणि कौशल्यांची माहिती अपडेट ठेवा. आपल्या अनुभवाची, शिक्षणाची आणि कामाची कौशल्यांची स्पष्ट माहिती द्या. नोकरी शोधण्यासाठी LinkedIn, Indeed, Naukri.com,  सारख्या जॉब माध्यमांचा वापर करू शकता. सोशल मीडिया आणि प्रोफेशनल नेटवर्क्सवर कनेक्शन साधा. तुमच्या रिझ्युमेमध्ये आवश्यक असलेली कौशल्ये आणि अनुभव प्रमुख ठेवा.


कांद्याला सरासरी 3700 भाव..

कांद्याचे मोठे मार्केट म्हणून देशभरात ओळख असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक प्रचंड वाढली आहे. काल एका दिवसात 1700 हून अधिक वाहनांतून जवळपास 29 हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली आहे. कांद्याला सध्या किमान 1200 ते कमाल 5100 रुपये प्रतिक्विंटल तर सरासरी 3700 रुपये भाव मिळाला आहे. राज्यभरातून कांदा तिथे दाखल होत आहे.

10 वीं- 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी 'एमएसबीएसएचएसई' अॅप


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांसाठी 'एमएसबीएसएचएसई' अॅप तयार केले आहे. या अॅपद्वारे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मॉडेल प्रश्नपत्रिका, टाइमटेबल, निकाल, सराव प्रश्नपत्रिका, नोटिफिकेशन्स आणि अद्ययावत माहिती मिळेल. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या चुकीच्या माहितीपासून विद्यार्थ्यांना वाचवण्याचे उद्दिष्ट आहे. शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी हे अॅप मोठ्या उपयोगाचे ठरणार आहे.

बँक ऑफ इंडियात जॉबची संधी!

बँक ऑफ इंडियात वॉचमन पदासाठी भरती जाहीर! रत्नागिरी झोनल ऑफिससाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. पात्रता: 7 वी ते 12 वी उत्तीर्ण. अनुभव आवश्यक. पगार: ₹ 12,000 प्रतिमहिना. वयोमर्यादा: 22 ते 40 वर्षे. अर्जाची अंतिम तारीख: 13 डिसेंबर 2024. निवड प्रक्रिया: मुलाखत. अर्ज शुल्क नाही. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://bankofindia.co.in. अर्ज करण्यापूर्वी सर्व अटी वाचून योग्य ती माहिती द्यावी.

प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना!

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना सुरू केली आहे. योजनेत ट्रॅक्टर खरेदीवर 20% ते 50% अनुदान मिळते. अर्जासाठी शेतकऱ्यांकडे आधार कार्ड, जमिनीची कागदपत्रे, बँक तपशील आणि फोटो असणे आवश्यक आहे. अर्जदार भारतीय असावा, स्वतःची जिरायती शेती असावी, वार्षिक उत्पन्न 1.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे, आणि योजनेचा लाभ आधी घेतलेला नसावा. अर्ज जवळच्या CSC केंद्रातून करता येतो. योजना शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी प्रोत्साहन देते.

लाडक्या बहिणींसाठी केंद्र सरकारची नवी योजना!

लाडक्या बहिणींसाठी केंद्र सरकारची नवी योजना -'विमा सखी योजना'! पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 डिसेंबर रोजी हरियाणात या योजनेचा शुभारंभ करतील. एलआयसीच्या माध्यमातून तीन वर्षांत 2 लाख महिलांना स्वावलंबी बनवण्याचा उद्देश आहे. 10वीं पास आणि 18 वर्षांवरील महिलांना या योजनेत सहभागी होता येईल. प्रशिक्षणादरम्यान पहिल्या वर्षी 7 हजार, दुसऱ्या वर्षी 6 हजार, आणि तिसऱ्या वर्षी 5 हजार स्टायपेंड मिळेल. प्रशिक्षणानंतर महिलांना एलआयसी एजंट किंवा डेव्हलपमेंट ऑफिसर होण्याची संधी मिळेल, तसेच कमीशनही मिळेल.

मोठ्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा थंडीचा कडाका

मोठ्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे. पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग आणि उत्तर भारतातील शीतलहरींमुळे तापमानात मोठी घट झाली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात तापमान 10 अंशांखाली आले असून, नाशिकमध्ये 4 अंशांनी घट होऊन तापमान 12 अंशांवर पोहोचले आहे. कोकण आणि मुंबईतही गारवा जाणवत आहे. पुढील 24 तासांत निरभ्र आकाशामुळे थंडीचा कडाका वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. महाराष्ट्रात पुढील 10 दिवस गारठा कायम राहणार असून, देशातही दिल्लीसह अनेक ठिकाणी थंडीची तीव्रता वाढली आहे.

Thursday, December 5, 2024

Maharashtra Chief Minister Swearing In Ceremony 2024

 महाराष्ट्र मुख्यमंत्री शपथविधी सोहळा 2024






 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शपथविधी सोहळा पहा लाईव्ह....
👇👇👇👇👇👇👇👇



 सौजन्य एबीपी माझा 



Wednesday, December 4, 2024

Trendig topics :आता AI सांगणार मृत्यूची तारीख अन् वेळ


आता AI सांगणार मृत्यूची तारीख अन् वेळ


AI आधारित "डेथ क्लॉक" अॅप तुम्हाला तुमच्या मृत्यूची तारीख आणि वेळ सांगण्याबरोबरच जीवनशैली सुधारण्यासाठी मार्गदर्शन करते. ब्रेंट फ्रॅन्सन यांनी विकसित केलेले हे अॅप 1200 विश्लेषणांवर आणि 53 दशलक्ष डेटाबेसवर आधारित आहे. आहार, व्यायाम, झोपेचा पॅटर्न यासह रोजच्या सवयींचे मूल्यांकन करून, ते आयुष्यमानाची माहिती देते. वैयक्तिक शिफारसींद्वारे आरोग्य सुधारण्याबरोबरच आर्थिक नियोजनासाठीही मदत करते. जुलै 2024 मध्ये लाँच झालेल्या या अॅपने आतापर्यंत 1.25 लाख डाउनलोड्स मिळवले आहेत.

 पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होणार

केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील विंडफॉल आणि इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्स रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे इंधनाच्या किंमती कमी होणार आहेत. विंडफॉल टॅक्स रद्द केल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किंमतीत घसरण होईल. या करामुळे काही परिस्थितींमध्ये पेट्रोलियम कंपन्यांना जास्त नफा मिळतो. सरकारने कच्च्या तेलाच्या उत्पादनावर आणि निर्यातीवरील टॅक्स रद्द केल्याची माहिती अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दिली आहे, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात मनाई आदेश लागू


सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) सर्वत्र शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून दि. 1 डिसेंबर 2024 सकाळी 8 वा. पासुन ते 15 डिसेंबर 2024 रात्री 8 वा. पर्यंत या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) व 37 (3) (अ ते फ) अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत, असे अपर जिल्हादंडाधिकारी मनिषा कुंभार यांनी कळविले आहे. या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, भाले, सुरे, झेंडा लावलेली काठी किंवा शरीरास ईजा करण्याकरीता वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेण्यास मनाई केली आहे.


सर्व बँक खातेदारांना मिळणार मोठं गिफ्ट



केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन डिसेंबर महिन्यात बँक खात्यांमधील नॉमिनी संबंधित नियमांमध्ये मोठी दुरुस्ती प्रस्तावित करणार आहेत. नव्या विधेयकानुसार, खातेदारांना त्यांच्या बँक खात्यासाठी 4 नॉमिनी नियुक्त करण्याचा पर्याय मिळणार आहे. याशिवाय, नॉमिनींना किती हिस्सा द्यायचा हे खातेदार ठरवू शकतील. सध्या खातेदार फक्त 1 नॉमिनी करू शकतात. हे विधेयक हिवाळी अधिवेशनात सादर होईल. याची कल्पना आयसीआयसीआय बँकेचे प्रमोद राव यांनी दिली होती.


महायुतीचा शपथविधी दणक्यात, 22 राज्याचे मुख्यमंत्री; 40 हजार लोक



महायुती सरकराचा शपथविधी 5 डिसेंबर 2024 रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. या सोहळ्याला तब्बल 40 हजार जणांची उपस्थिती असणार असल्याची माहिती समोर आलीय. शपथविधीसाठी जगभरातील प्रमुख पाहुण्यांसह जवळपास 40 हजार जणांची उपस्थिती असणार आहे. महायुती सरकारचा शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि सर्व केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. देशातील 22 राज्यांचे मुख्यमंत्री देखील सहभागी होणार आहेत.


महायुती सरकारची घोषणा! 1 लाख पदांची मेगाभरती


मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत राज्यातील सहा लाख प्रशिक्षणार्थींना ऑक्टोबर व नोव्हेंबरचे विद्यावेतन अद्याप मिळालेले नाही, त्यामुळे अनेकांनी आर्थिक अडचणींमुळे प्रशिक्षण अर्धवट सोडले आहे. राज्यात 10 लाख तरुणांना प्रशिक्षणाची संधी मिळणार असून, आतापर्यंत सर्वाधिक नोंदणी शासकीय विभागांमध्ये झाली आहे. दरम्यान, महायुती सरकारने 1 लाख पदांची मेगाभरती करण्याची घोषणा केली असून, प्रशिक्षणार्थींनाही संधी मिळण्याची शक्यता आहे.

गुगल मॅपच्या चुकीमुळे आणखी एक दुर्घटना


गुगल मॅपच्या चुकीमुळे झालेल्या अपघाताची आणखी एक घटना घडली आहे. कानपूरहून पिलीभीतला जाणाऱ्या तीन मित्रांची कार बरेलीच्या पीलीभीत रोडवरील कोरड्या कालव्यात पलटी झाली. सकाळी सहा वाजता घडलेल्या या अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नाही. कालव्याला पाणी नसल्याने तिघेही सुखरूप बचावले. गुगल मॅपने चुकीचा मार्ग दाखवून अपूर्ण रस्त्यावर नेले, ज्यामुळे हा अपघात झाला. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे रामगंगा नदीत कार पडून तिघांचा मृत्यू झाला होता. टेक्नोलॉजीच्या गैरवापरामुळे अशा घटना घडत आहेत.


मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या उपकंपनी, स्ट्रँड लाइफ सायन्सेसने कॅन्सरच्या प्राथमिक अवस्थेतील लक्षणे ओळखण्यासाठी रक्त-आधारित चाचणी "CancerSpot" सुरू केली आहे. या चाचणीद्वारे रक्ताच्या नमुन्याद्वारे कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांची ओळख होऊ शकते. भारतात कॅन्सरच्या उपचारांवर संशोधन करण्यास अडचणी होत्या, परंतु या नव्या चाचणीमुळे त्यावर अधिक संशोधन करणं शक्य होईल. कर्करोगाची प्रारंभिक अवस्था ओळखणे उपचारासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते. या चाचणीमुळे कॅन्सरवरील उपचारात सुधारणा होण्याची आशा आहे.




Sunday, December 1, 2024

Today trending news सोलापुरात लवकरच हेल्मेट सक्ती

 सोलापुरात लवकरच हेल्मेट सक्ती

दुचाकी चालकासोबत मागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट घालावे लागणार असून याबाबतची हेल्मेट सक्ती लवकरच सोलापूर शहर आणि जिल्ह्यात लागू होणार आहे. विना हेल्मेट दुचाकीस्वार व मागे बसणारा सह प्रवासी यांचा अपघात, मृत्यूमुखी तसेच जखमींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ़ होत आहे. यावर आळा घालण्यासाठी आता संपूर्ण राज्यात दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट सक्ती करणारे परिपत्रक पोलीस प्रशासनाने काढले आहे. यामुळे सोलापूरकर मात्र चांगलेच धास्तावले आहेत. या सक्तीला सोलापुरातून तीव्र विरोध होण्याची दाट शक्यता आहे.




डिसेंबर महिन्यात शाळा, महाविद्यालये आणि बँकांना अनेक सुट्ट्या



2024 च्या डिसेंबर महिन्यात शाळा, महाविद्यालये आणि बँकांना अनेक सुट्ट्या मिळतील. शाळा आणि महाविद्यालये 6 दिवस बंद राहतील, त्यात रविवार, महापरिनिर्वाण दिन (6 डिसें.), नाताळ (25 डिसें.), आणि इतर रविवारी सुट्ट्या समाविष्ट आहेत. बँकांना 17 दिवस बंद राहण्याची शक्यता आहे, ज्यात दूसरे व चौथे शनिवार, रविवार आणि ख्रिसमससारखी सुट्ट्यांचा समावेश आहे. डिसेंबर महिन्यात हिवाळ्याच्या सुट्ट्याही विद्यार्थ्यांसाठी मिळतील.


थंडीची लाट येणार, हवामान विभागाने दिला अलर्ट

दक्षिण पश्चिम बंगालच्या खाडीत तयार झालेल्या चक्रीवादळामुळे हवामानात मोठे बदल होत आहेत. पश्चिम बंगालमध्ये सायक्लोनिक सर्क्युलेशन निर्माण झाल्याने थंडीच्या लाटेचा इशारा मिळाला आहे. यंदा कडाक्याची थंडी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत थंडीचा जोर वाढला आहे. फेंगल चक्रीवादळामुळे राज्यात हवामान बदलत असून, पुणे, नाशिक, घाटमाथा आणि अहिल्यानगरमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात रात्री 7-8 डिग्रीपर्यंत तापमान खाली जाऊ शकते, ज्यामुळे पुणेकरांना गारठा जाणवतो आहे.

मुख्यमंत्री नाही, पण शपथविधीची तारीख ठरली



केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत काल दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं दिसतंय. अद्याप याची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, शपथविधीचा कार्यक्रमही ठरला आहे. मुंबईत हा सोहळा पार पडणार आहे. मुंबईत 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, अशी सुत्रांनी माहिती दिली आहे. 5 डिसेंबरला आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

भारतात धावणार पहिली हायड्रोजन रेल्वे

भारतीय रेल्वे लवकरच हरियाणामध्ये भारतातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनची चाचणी घेणार आहे. अहवालानुसार, या ट्रेनमध्ये 8 प्रवासी डबे असतील, ज्यामध्ये एका वेळी 2,638 लोक प्रवास करू शकतील. तर, ट्रेनचा कमाल वेग 110 किमी/ तास असेल. यात हायड्रोजन सिलिंडर, फ्युएल सेल कन्व्हर्टर, बॅटरी आणि एअर रिझर्व्हसाठी तीन कप्पे असतील.

भारतामध्ये 23 पेक्षा अधिक वेगवेगळ्या भाषा

भारतामध्ये 23 पेक्षा अधिक वेगवेगळ्या भाषा, 13 लिप्या आणि 720 हून अधिक बोलीभाषा आहेत. विविधतेने समृद्ध असलेल्या या देशात भाषा आणि संस्कृतींचे मोठे महत्त्व आहे. प्रत्येक राज्य आणि प्रांताची स्वतंत्र ओळख असली तरी, ही भाषिक विविधता भारताच्या सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक आहे. देशभरातील या विविध भाषांचे संगोपन आणि संवर्धन महत्त्वाचे आहे.

2024 मध्ये बँकांकडून 1700000000000 रुपयांचे कर्ज माफ!


सर्वसामान्य नागरिक ज्याप्रमाणे कर्ज घेतात, त्याप्रमाणे मोठे उद्योजकही कर्जासाठी बँकाकडे धाव घेतात. दरम्यान कर्ज फेडता न आल्यावर अनेकजण कर्जमाफीसाठी अर्ज करतात. भारतीय बँकांनी 2023-24 (FY24) आर्थिक वर्षात 1.7 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. कर्जमाफीत पंजाब नॅशनल बँक (18 हजार 317 कोटी) अग्रेसर आहे. त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, ICICI बँक आणि अॅक्सिस बँकेचा नंबर लागतो.

इंग्रजांनी 158 वर्षांपूर्वी बांधलेल्या पुलावरुन अजूनही धावतात शेकडो ट्रेन

उत्तर प्रदेशातील बांदा-झांसी-कानपूर रेल्वे मार्गावरील 158 वर्ष जुना पूल, जो इंग्रजांनी 1965 मध्ये बांधला होता, अजूनही वापरात आहे. 2015 मध्ये त्याची तपासणी करून त्याची वयोमर्यादा 50 वर्षांनी वाढवली गेली होती. केंद्रीय पथकाने पुनः तपासणी केली आणि पुलाची परिस्थिती चांगली असल्याचे सांगितले. यामुळे पुन्हा 50 वर्षांसाठी पूल वापरण्याची मंजुरी देण्यात आली. हा पूल ऐतिहासिक आणि तांत्रिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे.


ट्रेनचं तिकीट दुसऱ्याच्या नावावर असं करा ट्रान्सफर


भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी एक खास सुविधा म्हणजे तिकीट ट्रान्सफर. रद्द शुल्क टाळण्यासाठी प्रवासी कुटुंबातील सदस्यांच्या नावावर तिकीट ट्रान्सफर करू शकतात. यासाठी, ट्रेन सुटण्याच्या किमान 24 तास आधी रेल्वे काऊंटरवर अर्ज करावा लागतो. कुटुंब सदस्याची ओळखपत्र आणि फोटो कॉपी घेऊन काऊंटरवर तिकीट ट्रान्सफर फॉर्म भरावा लागतो. यासोबतच, ऑनलाइन बुक केलेल्या तिकिटावर बोर्डिंग स्टेशन बदलण्याची सुविधा देखील आहे.


हे 15 अॅप्स लगेच डिलेट करा! अन्यथा बसेल फटका


भारतात सर्वाधिक लोकांकडे बनावट अॅप्स आहेत. अनेकांनी Google Play Store वरून असे अॅप डाउनलोड केले आहेत, जे त्वरित कर्ज देण्याचे आश्वासन देतात. परंतु प्रत्यक्षात हे फसवे अॅप आहेत. हे अॅप्स डाउनलोड करणाऱ्यांची संख्या करोडोंच्या घरात आहे. हे अॅप्स तुमचे नाव, पत्ता, फोन नंबर आणि बँक डिटेल्स चोरू शकतात. त्यानंतर हे लोक तुमच्या बँक अकाउंटमधून पैसे काढू शकतात. काही अॅप्स स्टोअरमधून काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे अद्यापही तुमच्या मोबाईलमध्ये हे अॅप्स असतील तर लगेच डिलेट करा. वरील फोटोत पहा अॅप्सची यादी.


Thursday, November 28, 2024

Trending topic news today: दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

 दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर..



महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात येणाऱ्या बारावी आणि दहावीच्या परीक्षेचे बोर्डाचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. बारावीची लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत होणार आहे. बारावीची प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन, तोंडी परीक्षा 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत, तर दहावीची प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन, तोंडी परीक्षा 3 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.


रात्र वैऱ्याची! संकट घोंघावतंय, चक्रीवादळ येतंय

भारतीय किनारपट्टीवर पुन्हा एकदा चक्रीवादळ धडकणार आहे. त्यामुळे किनारपट्टी भागातील सर्वसामान्य नागरिकांची धाकधूक वाढली आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्व काळजी घेतली जात आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज मध्यरात्रीपासून चक्रीवादळाचा वेग वाढणार आहे. या चक्रीवादळाचं नाव फेंगल असं आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं आता चक्रीवादळात रुपांतर होत आहे. आज रात्री त्याचं रुपांतर चक्रीवादळात होईल. यावेळी वाऱ्याचा वेग 60 ते 70 किमी प्रति तास इतका असेल.


सोलापूर: विद्यापीठाच्या परीक्षा दुसऱ्यांदा पुढे ढकलल्या...



पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा विधानसभा निवडणुकीनंतर आज सुरू होणार होत्या. मात्र, निवडणुकीच्या ड्युटीसाठी टिचिंग, नॉनटीचिंगमधील कर्मचारी व्यस्त होते. निवडणूक संपली असली, तर अद्याप काहीजणांचे परीक्षा अर्ज भरायचे राहिले आहेत. त्यासाठी दोन डिसेंबरची मुदत महाविद्यालयाने मागितली आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या आहेत. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात परीक्षा होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे यांनी दिली.

सोलापूर: थकीत कर्ज एकरकमी भरणाऱ्या लाभार्थ्यास 50 टक्के सवलत



सोलापूर जिल्ह्यातील ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरकमी भरणा करण्याऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत देण्याबाबतची एकरकमी परतावा (OTS) योजना दि. 31 मार्च 2025 पर्यंत राबविण्यात येत आहे. महामंडळाच्या सर्व योजनेतील थकबाकीदार लाभार्थींनी या योजनेचा फायदा घेऊन कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन ओबीसी महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालयास प्रत्यक्ष भेट द्यावी, असे आवाहनही ओबीसी महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

राज्यात आणखी दोन नवे रेल्वेमार्ग..

रेल्वे विभागाकडून महाराष्ट्रासाठी एक गुडन्यूज देण्यात आली आहे. केंद्र सरकारने तीन रेल्वे मार्गासाठी मंजुरी दिली आहे. यापैकी महाराष्ट्रातल्या दोन मार्गांचा समावेश आहे. याचा फायदा थेट शेतकऱ्यांना देखील होणार आहे. या प्रकल्पामध्ये जळगाव- मनमाड चौथा रेल्वेमार्ग 160 कि.मी., भुसावळ ते खंडवा तिसरा आणि चौथा रेल्वेमार्ग 131 कि.मी. आणि प्रयागराज ते माणिकपूर असा तिसरा रेल्वे मार्ग 84 कि.मी.चा आहे.रेल्वेचे व्यवस्थापक धर्मेंद्र मीना यांनी भुसावळ येथे प्रसारमाध्यमांना नुकतीच ही माहिती दिली.


ई-केवायसी न केल्यास रेशन बंद होणार..



भारत सरकारने मोफत रेशन योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य केले आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी न केल्यास लाभार्थ्यांना रेशन मिळणार नाही. या निर्णयाचा उद्देश योजनेत पारदर्शकता आणणे आणि खोट्या लाभार्थ्यांवर कारवाई करणे आहे. पुढील पाच वर्षे सुरू राहणाऱ्या या योजनेचा लाभ 80 कोटी नागरिकांना होणार आहे. गहू, तांदूळ आणि इतर अन्नधान्य मोफत दिले जाणार आहे. खोट्या रेशन कार्डांचा गैरवापर थांबवण्यासाठी सरकारने हा कठोर निर्णय घेतला असून, केवळ गरजू नागरिकांनाच याचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे.

2 दिवस पाणीपुरवठा बंद..

लोअर परळ परिसरातील तानसा मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम 28 आणि 29 नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहे. 1450 मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे लोअर परळ, दादर आणि प्रभादेवी भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहील. या कार्यामुळे संबंधित परिसरात पाणीपुरवठा तात्पुरता थांबवला जाणार आहे. नागरिकांना पाणी बचतीसाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. पाणीपुरवठा पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा ही संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.



'या' शेतकऱ्यांना मिळणार 2,000 रुपये, सरकारकडून नवीन यादी जाहीर

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जर तुम्ही काही काळापूर्वी पीएम किसान योजनेअंतर्गत नोंदणी केली असेल, तर तुम्हाला तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे का, हे तपासणे आवश्यक आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत भारत सरकार 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे हस्तांतरित करते. यासाठी, शेतकऱ्यांनी पीएम किसान पोर्टलवर जाऊन आपली नोंदणी तपासावी आणि यादीमध्ये त्यांचे नाव आहे का ते पाहावे. हे तुम्ही मोबाईल किंवा कंप्युटरवर ऑनलाइन सहज तपासू शकता.









Monday, November 25, 2024

Oath Ceremony at Wankhede Stadium on Monday 25th

 25 तारखेला सोमवारी वानखेडे स्टेडियमला शपथविधी



महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी हॅट्रिक केली आहे. भाजपला पुन्हा एकदा सर्वात जास्त मतं मिळाले असून, महायुतीला एकत्र 234 जागांवर विजय मिळाला आहे. 1990 नंतर भाजपने तिसऱ्यांदा 100 हून अधिक जागा जिंकल्या असून, या विक्रमामुळे भाजप एकमेव

पक्ष म्हणून ठरला आहे. नव्या सरकारचा शपथविधी 25 तारखेला होणार असल्याची माहिती आहे. शपथविधी सोहळा वानखेडे स्टेडियमवर आयोजित करण्याची योजना महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात येत असल्याची चर्चा आहे.


महायुतीत सीएम पदासाठी 2-2-1 फॉर्म्युला ठरला?






महायुतीतील मुख्यमंत्री पदासाठी एक फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे. यानुसार, फडणवीस 2 वर्ष, शिंदे 2 वर्ष आणि अजित पवार 1 वर्ष मुख्यमंत्री पदावर राहणार असल्याची चर्चा सुरू आहे. तिन्ही नेत्यांमध्ये सीएम पदासाठी इच्छाशक्ती दिसून येते. या फॉर्म्युलामुळे महायुतीतील सत्ता वाटपावर चर्चा सुरू झाली असून, राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे.

सीएनजी महाग; रिक्षा भाड्यात वाढीची शक्यता



विधानसभा निकालाच्या दुसऱ्या दिवशी सीएनजी दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीचा फटका आता रिक्षा भाड्यांवर बसण्याची शक्यता आहे. रिक्षा युनियनने प्रति किलोमीटर 2-2.5 रुपयांनी भाडे वाढवण्याची मागणी केली आहे. दरवाढीमुळे प्रवाशांच्या खर्चात मोठी भर पडेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यामुळे सर्वसामान्यांना आणखी आर्थिक ताण सहन करावा लागणार आहे.

लाडक्या बहिणींना 2100 रुपये दरमहा देणार, शिंदेंची घोषणा 



उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरल्याचं म्हटलं आहे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही लाडक्या बहिणींचे आभार मानले असून, त्यांना शुभेच्छा दिल्या. वर्षा निवासस्थानी शिंदे यांनी लाडक्या बहिणींसाठी 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देण्याची घोषणा केली, जे महायुतीच्या जाहीरनाम्यात वचन दिलं होतं. शिंदे यांनी लाडक्या बहिणींना राज्यात इतिहास घडवण्याचे श्रेय दिले.

'या' महिन्यात येऊ शकतो PM Kisan योजनेचा 19वा हप्ता






पीएम किसान सन्मान निधी योजनेचा प्रत्येक हप्ता चार महिन्यांच्या अंतराने जारी केला जातो. 18 वा हप्ता ऑक्टोबर महिन्यात जारी झाला होता, त्यामुळे 19 वा हप्ता पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात येण्याची शक्यता आहे. या योजनेद्वारे, भारत सरकार आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत देत आहे, जी तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते. आतापर्यंत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. आता देशभरातील शेतकरी 19 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.


दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर होण्याचा मार्ग सुकर


दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आयुर्वेदिक डॉक्टर होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. भारतीय वैद्य पद्धत राष्ट्रीय आयोगाने दहावीनंतर थेट बीएएमसी पदवी प्रवेशाची संधी दिली आहे. विद्यार्थ्यांना साडेसात वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून डॉक्टर होण्याची संधी मिळेल. यामध्ये दोन वर्षांचा प्री आयुर्वेद प्रोग्रॅम (पीएपी) आणि साडेचार वर्षांचा बीएएमएस अभ्यासक्रम असेल. विद्यार्थ्यांना 75% हजेरी आणि 50% गुणांची अट पूर्ण करावी लागेल. प्रवेशासाठी नीट-पीएपी परीक्षा आवश्यक आहे.




Sunday, November 24, 2024

Today update news:शेतकऱ्यांना खुशखबर!

 सोलापूर जिल्ह्यात मतदारांची नोटाला पसंती

सोलापूर जिल्ह्यात 9896 मतदारांनी 'नोटा' ला पसंती दिली. सर्वाधिक 1106 मते सांगोल्यात, तर सर्वात कमी 557 मते शहर मध्य मतदारसंघात मिळाली. 'नोटा’पेक्षा कमी मते मिळालेल्यांमध्ये अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी, काँग्रेसचे चेतन नरोटे, माकपचे नरसय्या आडम यांच्यासह 159 उमेदवारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे 5 उमेदवारांना 'नोटा'पेक्षाही कमी मते मिळाली. यामुळे 159 उमेदवारांचे सुमारे 12 लाख रुपयांचे डिपॉझिट जप्त झाले. मात्र, अमर पाटील यांनी केवळ 2535 मतांनी डिपॉझिट वाचवले.


राज्यात सर्वाधिक मते कोणाला मिळाली..?

विधानसभा 2024 निकालात भाजपचे शिवेंद्रराजे भोसले (सातारा) 1.42 लाख मताधिक्याने विजयी होत पहिल्या क्रमांकावर. धनंजय मुंडे (परळी) 1.41 लाख मतांनी दुसऱ्या स्थानी, तर दिलीप बोरसे (बागलाण) 1.29 लाख मतांनी तिसऱ्या स्थानी आहेत. अजित पवार (बारामती) यंदा 1.08 लाख मताधिक्याने नवव्या स्थानावर आहेत. इतर टॉप 10 विजेत्यांमध्ये एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील, प्रताप सरनाईक, सुनील शेळके, शंकर जगताप, आणि दादा भुसे यांचा समावेश आहे.


शेतकऱ्यांना खुशखबर! आता 15 हजार रुपये मिळणार..


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता वार्षिक ₹15000 दिले जाणार आहेत. यापूर्वी शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून ₹6000 मिळत होते, पण आता राज्य सरकार ₹9000 अधिक देणार आहे, ज्यामुळे एकूण ₹ 15000 होईल. या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा महत्त्वपूर्ण आधार मिळणार आहे. हा निर्णय राज्यातील कृषी समुदायाच्या आर्थिक स्थितीला सुधारण्यासाठी महत्त्वाचा ठरेल.

ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार...



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारत PMJAY योजनेचा विस्तार करत 70 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचाराची सुविधा दिली आहे. आर्थिक स्थितीची कोणतीही अट नसल्याने सुमारे 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ होणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आणि वयोमानाचा पुरावा असणे अनिवार्य आहे. नेटवर्क हॉस्पिटलमध्ये ही सेवा उपलब्ध असून, आर्थिक स्थितीकडे न पाहता सर्व ज्येष्ठ नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळणार आहे.


महाराष्ट्रासह भारतातील निकालाची जगभरात चर्चा..


महाराष्ट्रासह देशभरातील अनेक ठिकाणी काल निवडणुकांचे निकाल लागले. याची चर्चा जगभरात सुरु आहे. कारण, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी ट्विटरवर लिहिले, की "भारताने 1 दिवसात 640 दशलक्ष (64 कोटी) मते मोजली. अमेरिका-कॅलिफोर्नियामध्ये अजूनही मतांची मोजणी सुरू आहे." दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भारताने मतांची मोजणी कशी केली? या एका न्यूज पेपरच्या बातमीवर मस्क यांनी ही पोस्ट केली आहे.

Saturday, November 23, 2024

Maharashtra Watch Live Assembly Vote Counting


विधानसभा 2024  मतमोजणी...
Watch Live Assembly Vote Counting2024


राजनीतीNews 
Solapur Live Update 👇👇👇


👇👇👇👇👇👇👇


 सौजन्य tv9 मराठी 




ABP माझा 👇👇👇👇 Live update 


Zee News marathi👇👇👇Live update 











Government employees will get 26 public holidays in the new year.

  नवीन वर्षात मिळणार शासकीय कर्मचाऱ्यांना 26 सार्वजनिक सुट्ट्या.... 2025 साली महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना 26 सार्वजन...