Fiverr

Sunday, December 1, 2024

Today trending news सोलापुरात लवकरच हेल्मेट सक्ती

 सोलापुरात लवकरच हेल्मेट सक्ती

दुचाकी चालकासोबत मागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट घालावे लागणार असून याबाबतची हेल्मेट सक्ती लवकरच सोलापूर शहर आणि जिल्ह्यात लागू होणार आहे. विना हेल्मेट दुचाकीस्वार व मागे बसणारा सह प्रवासी यांचा अपघात, मृत्यूमुखी तसेच जखमींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ़ होत आहे. यावर आळा घालण्यासाठी आता संपूर्ण राज्यात दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट सक्ती करणारे परिपत्रक पोलीस प्रशासनाने काढले आहे. यामुळे सोलापूरकर मात्र चांगलेच धास्तावले आहेत. या सक्तीला सोलापुरातून तीव्र विरोध होण्याची दाट शक्यता आहे.




डिसेंबर महिन्यात शाळा, महाविद्यालये आणि बँकांना अनेक सुट्ट्या



2024 च्या डिसेंबर महिन्यात शाळा, महाविद्यालये आणि बँकांना अनेक सुट्ट्या मिळतील. शाळा आणि महाविद्यालये 6 दिवस बंद राहतील, त्यात रविवार, महापरिनिर्वाण दिन (6 डिसें.), नाताळ (25 डिसें.), आणि इतर रविवारी सुट्ट्या समाविष्ट आहेत. बँकांना 17 दिवस बंद राहण्याची शक्यता आहे, ज्यात दूसरे व चौथे शनिवार, रविवार आणि ख्रिसमससारखी सुट्ट्यांचा समावेश आहे. डिसेंबर महिन्यात हिवाळ्याच्या सुट्ट्याही विद्यार्थ्यांसाठी मिळतील.


थंडीची लाट येणार, हवामान विभागाने दिला अलर्ट

दक्षिण पश्चिम बंगालच्या खाडीत तयार झालेल्या चक्रीवादळामुळे हवामानात मोठे बदल होत आहेत. पश्चिम बंगालमध्ये सायक्लोनिक सर्क्युलेशन निर्माण झाल्याने थंडीच्या लाटेचा इशारा मिळाला आहे. यंदा कडाक्याची थंडी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत थंडीचा जोर वाढला आहे. फेंगल चक्रीवादळामुळे राज्यात हवामान बदलत असून, पुणे, नाशिक, घाटमाथा आणि अहिल्यानगरमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात रात्री 7-8 डिग्रीपर्यंत तापमान खाली जाऊ शकते, ज्यामुळे पुणेकरांना गारठा जाणवतो आहे.

मुख्यमंत्री नाही, पण शपथविधीची तारीख ठरली



केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत काल दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं दिसतंय. अद्याप याची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, शपथविधीचा कार्यक्रमही ठरला आहे. मुंबईत हा सोहळा पार पडणार आहे. मुंबईत 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, अशी सुत्रांनी माहिती दिली आहे. 5 डिसेंबरला आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

भारतात धावणार पहिली हायड्रोजन रेल्वे

भारतीय रेल्वे लवकरच हरियाणामध्ये भारतातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनची चाचणी घेणार आहे. अहवालानुसार, या ट्रेनमध्ये 8 प्रवासी डबे असतील, ज्यामध्ये एका वेळी 2,638 लोक प्रवास करू शकतील. तर, ट्रेनचा कमाल वेग 110 किमी/ तास असेल. यात हायड्रोजन सिलिंडर, फ्युएल सेल कन्व्हर्टर, बॅटरी आणि एअर रिझर्व्हसाठी तीन कप्पे असतील.

भारतामध्ये 23 पेक्षा अधिक वेगवेगळ्या भाषा

भारतामध्ये 23 पेक्षा अधिक वेगवेगळ्या भाषा, 13 लिप्या आणि 720 हून अधिक बोलीभाषा आहेत. विविधतेने समृद्ध असलेल्या या देशात भाषा आणि संस्कृतींचे मोठे महत्त्व आहे. प्रत्येक राज्य आणि प्रांताची स्वतंत्र ओळख असली तरी, ही भाषिक विविधता भारताच्या सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक आहे. देशभरातील या विविध भाषांचे संगोपन आणि संवर्धन महत्त्वाचे आहे.

2024 मध्ये बँकांकडून 1700000000000 रुपयांचे कर्ज माफ!


सर्वसामान्य नागरिक ज्याप्रमाणे कर्ज घेतात, त्याप्रमाणे मोठे उद्योजकही कर्जासाठी बँकाकडे धाव घेतात. दरम्यान कर्ज फेडता न आल्यावर अनेकजण कर्जमाफीसाठी अर्ज करतात. भारतीय बँकांनी 2023-24 (FY24) आर्थिक वर्षात 1.7 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. कर्जमाफीत पंजाब नॅशनल बँक (18 हजार 317 कोटी) अग्रेसर आहे. त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, ICICI बँक आणि अॅक्सिस बँकेचा नंबर लागतो.

इंग्रजांनी 158 वर्षांपूर्वी बांधलेल्या पुलावरुन अजूनही धावतात शेकडो ट्रेन

उत्तर प्रदेशातील बांदा-झांसी-कानपूर रेल्वे मार्गावरील 158 वर्ष जुना पूल, जो इंग्रजांनी 1965 मध्ये बांधला होता, अजूनही वापरात आहे. 2015 मध्ये त्याची तपासणी करून त्याची वयोमर्यादा 50 वर्षांनी वाढवली गेली होती. केंद्रीय पथकाने पुनः तपासणी केली आणि पुलाची परिस्थिती चांगली असल्याचे सांगितले. यामुळे पुन्हा 50 वर्षांसाठी पूल वापरण्याची मंजुरी देण्यात आली. हा पूल ऐतिहासिक आणि तांत्रिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे.


ट्रेनचं तिकीट दुसऱ्याच्या नावावर असं करा ट्रान्सफर


भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी एक खास सुविधा म्हणजे तिकीट ट्रान्सफर. रद्द शुल्क टाळण्यासाठी प्रवासी कुटुंबातील सदस्यांच्या नावावर तिकीट ट्रान्सफर करू शकतात. यासाठी, ट्रेन सुटण्याच्या किमान 24 तास आधी रेल्वे काऊंटरवर अर्ज करावा लागतो. कुटुंब सदस्याची ओळखपत्र आणि फोटो कॉपी घेऊन काऊंटरवर तिकीट ट्रान्सफर फॉर्म भरावा लागतो. यासोबतच, ऑनलाइन बुक केलेल्या तिकिटावर बोर्डिंग स्टेशन बदलण्याची सुविधा देखील आहे.


हे 15 अॅप्स लगेच डिलेट करा! अन्यथा बसेल फटका


भारतात सर्वाधिक लोकांकडे बनावट अॅप्स आहेत. अनेकांनी Google Play Store वरून असे अॅप डाउनलोड केले आहेत, जे त्वरित कर्ज देण्याचे आश्वासन देतात. परंतु प्रत्यक्षात हे फसवे अॅप आहेत. हे अॅप्स डाउनलोड करणाऱ्यांची संख्या करोडोंच्या घरात आहे. हे अॅप्स तुमचे नाव, पत्ता, फोन नंबर आणि बँक डिटेल्स चोरू शकतात. त्यानंतर हे लोक तुमच्या बँक अकाउंटमधून पैसे काढू शकतात. काही अॅप्स स्टोअरमधून काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे अद्यापही तुमच्या मोबाईलमध्ये हे अॅप्स असतील तर लगेच डिलेट करा. वरील फोटोत पहा अॅप्सची यादी.


Thursday, November 28, 2024

Trending topic news today: दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

 दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर..



महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात येणाऱ्या बारावी आणि दहावीच्या परीक्षेचे बोर्डाचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. बारावीची लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत होणार आहे. बारावीची प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन, तोंडी परीक्षा 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत, तर दहावीची प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन, तोंडी परीक्षा 3 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.


रात्र वैऱ्याची! संकट घोंघावतंय, चक्रीवादळ येतंय

भारतीय किनारपट्टीवर पुन्हा एकदा चक्रीवादळ धडकणार आहे. त्यामुळे किनारपट्टी भागातील सर्वसामान्य नागरिकांची धाकधूक वाढली आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्व काळजी घेतली जात आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज मध्यरात्रीपासून चक्रीवादळाचा वेग वाढणार आहे. या चक्रीवादळाचं नाव फेंगल असं आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं आता चक्रीवादळात रुपांतर होत आहे. आज रात्री त्याचं रुपांतर चक्रीवादळात होईल. यावेळी वाऱ्याचा वेग 60 ते 70 किमी प्रति तास इतका असेल.


सोलापूर: विद्यापीठाच्या परीक्षा दुसऱ्यांदा पुढे ढकलल्या...



पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा विधानसभा निवडणुकीनंतर आज सुरू होणार होत्या. मात्र, निवडणुकीच्या ड्युटीसाठी टिचिंग, नॉनटीचिंगमधील कर्मचारी व्यस्त होते. निवडणूक संपली असली, तर अद्याप काहीजणांचे परीक्षा अर्ज भरायचे राहिले आहेत. त्यासाठी दोन डिसेंबरची मुदत महाविद्यालयाने मागितली आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या आहेत. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात परीक्षा होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे यांनी दिली.

सोलापूर: थकीत कर्ज एकरकमी भरणाऱ्या लाभार्थ्यास 50 टक्के सवलत



सोलापूर जिल्ह्यातील ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरकमी भरणा करण्याऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत देण्याबाबतची एकरकमी परतावा (OTS) योजना दि. 31 मार्च 2025 पर्यंत राबविण्यात येत आहे. महामंडळाच्या सर्व योजनेतील थकबाकीदार लाभार्थींनी या योजनेचा फायदा घेऊन कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन ओबीसी महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालयास प्रत्यक्ष भेट द्यावी, असे आवाहनही ओबीसी महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

राज्यात आणखी दोन नवे रेल्वेमार्ग..

रेल्वे विभागाकडून महाराष्ट्रासाठी एक गुडन्यूज देण्यात आली आहे. केंद्र सरकारने तीन रेल्वे मार्गासाठी मंजुरी दिली आहे. यापैकी महाराष्ट्रातल्या दोन मार्गांचा समावेश आहे. याचा फायदा थेट शेतकऱ्यांना देखील होणार आहे. या प्रकल्पामध्ये जळगाव- मनमाड चौथा रेल्वेमार्ग 160 कि.मी., भुसावळ ते खंडवा तिसरा आणि चौथा रेल्वेमार्ग 131 कि.मी. आणि प्रयागराज ते माणिकपूर असा तिसरा रेल्वे मार्ग 84 कि.मी.चा आहे.रेल्वेचे व्यवस्थापक धर्मेंद्र मीना यांनी भुसावळ येथे प्रसारमाध्यमांना नुकतीच ही माहिती दिली.


ई-केवायसी न केल्यास रेशन बंद होणार..



भारत सरकारने मोफत रेशन योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य केले आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी न केल्यास लाभार्थ्यांना रेशन मिळणार नाही. या निर्णयाचा उद्देश योजनेत पारदर्शकता आणणे आणि खोट्या लाभार्थ्यांवर कारवाई करणे आहे. पुढील पाच वर्षे सुरू राहणाऱ्या या योजनेचा लाभ 80 कोटी नागरिकांना होणार आहे. गहू, तांदूळ आणि इतर अन्नधान्य मोफत दिले जाणार आहे. खोट्या रेशन कार्डांचा गैरवापर थांबवण्यासाठी सरकारने हा कठोर निर्णय घेतला असून, केवळ गरजू नागरिकांनाच याचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे.

2 दिवस पाणीपुरवठा बंद..

लोअर परळ परिसरातील तानसा मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम 28 आणि 29 नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहे. 1450 मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे लोअर परळ, दादर आणि प्रभादेवी भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहील. या कार्यामुळे संबंधित परिसरात पाणीपुरवठा तात्पुरता थांबवला जाणार आहे. नागरिकांना पाणी बचतीसाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. पाणीपुरवठा पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा ही संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.



'या' शेतकऱ्यांना मिळणार 2,000 रुपये, सरकारकडून नवीन यादी जाहीर

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जर तुम्ही काही काळापूर्वी पीएम किसान योजनेअंतर्गत नोंदणी केली असेल, तर तुम्हाला तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे का, हे तपासणे आवश्यक आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत भारत सरकार 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे हस्तांतरित करते. यासाठी, शेतकऱ्यांनी पीएम किसान पोर्टलवर जाऊन आपली नोंदणी तपासावी आणि यादीमध्ये त्यांचे नाव आहे का ते पाहावे. हे तुम्ही मोबाईल किंवा कंप्युटरवर ऑनलाइन सहज तपासू शकता.









Monday, November 25, 2024

Oath Ceremony at Wankhede Stadium on Monday 25th

 25 तारखेला सोमवारी वानखेडे स्टेडियमला शपथविधी



महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी हॅट्रिक केली आहे. भाजपला पुन्हा एकदा सर्वात जास्त मतं मिळाले असून, महायुतीला एकत्र 234 जागांवर विजय मिळाला आहे. 1990 नंतर भाजपने तिसऱ्यांदा 100 हून अधिक जागा जिंकल्या असून, या विक्रमामुळे भाजप एकमेव

पक्ष म्हणून ठरला आहे. नव्या सरकारचा शपथविधी 25 तारखेला होणार असल्याची माहिती आहे. शपथविधी सोहळा वानखेडे स्टेडियमवर आयोजित करण्याची योजना महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात येत असल्याची चर्चा आहे.


महायुतीत सीएम पदासाठी 2-2-1 फॉर्म्युला ठरला?






महायुतीतील मुख्यमंत्री पदासाठी एक फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे. यानुसार, फडणवीस 2 वर्ष, शिंदे 2 वर्ष आणि अजित पवार 1 वर्ष मुख्यमंत्री पदावर राहणार असल्याची चर्चा सुरू आहे. तिन्ही नेत्यांमध्ये सीएम पदासाठी इच्छाशक्ती दिसून येते. या फॉर्म्युलामुळे महायुतीतील सत्ता वाटपावर चर्चा सुरू झाली असून, राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे.

सीएनजी महाग; रिक्षा भाड्यात वाढीची शक्यता



विधानसभा निकालाच्या दुसऱ्या दिवशी सीएनजी दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीचा फटका आता रिक्षा भाड्यांवर बसण्याची शक्यता आहे. रिक्षा युनियनने प्रति किलोमीटर 2-2.5 रुपयांनी भाडे वाढवण्याची मागणी केली आहे. दरवाढीमुळे प्रवाशांच्या खर्चात मोठी भर पडेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यामुळे सर्वसामान्यांना आणखी आर्थिक ताण सहन करावा लागणार आहे.

लाडक्या बहिणींना 2100 रुपये दरमहा देणार, शिंदेंची घोषणा 



उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरल्याचं म्हटलं आहे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही लाडक्या बहिणींचे आभार मानले असून, त्यांना शुभेच्छा दिल्या. वर्षा निवासस्थानी शिंदे यांनी लाडक्या बहिणींसाठी 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देण्याची घोषणा केली, जे महायुतीच्या जाहीरनाम्यात वचन दिलं होतं. शिंदे यांनी लाडक्या बहिणींना राज्यात इतिहास घडवण्याचे श्रेय दिले.

'या' महिन्यात येऊ शकतो PM Kisan योजनेचा 19वा हप्ता






पीएम किसान सन्मान निधी योजनेचा प्रत्येक हप्ता चार महिन्यांच्या अंतराने जारी केला जातो. 18 वा हप्ता ऑक्टोबर महिन्यात जारी झाला होता, त्यामुळे 19 वा हप्ता पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात येण्याची शक्यता आहे. या योजनेद्वारे, भारत सरकार आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत देत आहे, जी तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते. आतापर्यंत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. आता देशभरातील शेतकरी 19 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.


दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर होण्याचा मार्ग सुकर


दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आयुर्वेदिक डॉक्टर होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. भारतीय वैद्य पद्धत राष्ट्रीय आयोगाने दहावीनंतर थेट बीएएमसी पदवी प्रवेशाची संधी दिली आहे. विद्यार्थ्यांना साडेसात वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून डॉक्टर होण्याची संधी मिळेल. यामध्ये दोन वर्षांचा प्री आयुर्वेद प्रोग्रॅम (पीएपी) आणि साडेचार वर्षांचा बीएएमएस अभ्यासक्रम असेल. विद्यार्थ्यांना 75% हजेरी आणि 50% गुणांची अट पूर्ण करावी लागेल. प्रवेशासाठी नीट-पीएपी परीक्षा आवश्यक आहे.




Sunday, November 24, 2024

Today update news:शेतकऱ्यांना खुशखबर!

 सोलापूर जिल्ह्यात मतदारांची नोटाला पसंती

सोलापूर जिल्ह्यात 9896 मतदारांनी 'नोटा' ला पसंती दिली. सर्वाधिक 1106 मते सांगोल्यात, तर सर्वात कमी 557 मते शहर मध्य मतदारसंघात मिळाली. 'नोटा’पेक्षा कमी मते मिळालेल्यांमध्ये अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी, काँग्रेसचे चेतन नरोटे, माकपचे नरसय्या आडम यांच्यासह 159 उमेदवारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे 5 उमेदवारांना 'नोटा'पेक्षाही कमी मते मिळाली. यामुळे 159 उमेदवारांचे सुमारे 12 लाख रुपयांचे डिपॉझिट जप्त झाले. मात्र, अमर पाटील यांनी केवळ 2535 मतांनी डिपॉझिट वाचवले.


राज्यात सर्वाधिक मते कोणाला मिळाली..?

विधानसभा 2024 निकालात भाजपचे शिवेंद्रराजे भोसले (सातारा) 1.42 लाख मताधिक्याने विजयी होत पहिल्या क्रमांकावर. धनंजय मुंडे (परळी) 1.41 लाख मतांनी दुसऱ्या स्थानी, तर दिलीप बोरसे (बागलाण) 1.29 लाख मतांनी तिसऱ्या स्थानी आहेत. अजित पवार (बारामती) यंदा 1.08 लाख मताधिक्याने नवव्या स्थानावर आहेत. इतर टॉप 10 विजेत्यांमध्ये एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील, प्रताप सरनाईक, सुनील शेळके, शंकर जगताप, आणि दादा भुसे यांचा समावेश आहे.


शेतकऱ्यांना खुशखबर! आता 15 हजार रुपये मिळणार..


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता वार्षिक ₹15000 दिले जाणार आहेत. यापूर्वी शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून ₹6000 मिळत होते, पण आता राज्य सरकार ₹9000 अधिक देणार आहे, ज्यामुळे एकूण ₹ 15000 होईल. या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा महत्त्वपूर्ण आधार मिळणार आहे. हा निर्णय राज्यातील कृषी समुदायाच्या आर्थिक स्थितीला सुधारण्यासाठी महत्त्वाचा ठरेल.

ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार...



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारत PMJAY योजनेचा विस्तार करत 70 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचाराची सुविधा दिली आहे. आर्थिक स्थितीची कोणतीही अट नसल्याने सुमारे 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ होणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आणि वयोमानाचा पुरावा असणे अनिवार्य आहे. नेटवर्क हॉस्पिटलमध्ये ही सेवा उपलब्ध असून, आर्थिक स्थितीकडे न पाहता सर्व ज्येष्ठ नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळणार आहे.


महाराष्ट्रासह भारतातील निकालाची जगभरात चर्चा..


महाराष्ट्रासह देशभरातील अनेक ठिकाणी काल निवडणुकांचे निकाल लागले. याची चर्चा जगभरात सुरु आहे. कारण, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी ट्विटरवर लिहिले, की "भारताने 1 दिवसात 640 दशलक्ष (64 कोटी) मते मोजली. अमेरिका-कॅलिफोर्नियामध्ये अजूनही मतांची मोजणी सुरू आहे." दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भारताने मतांची मोजणी कशी केली? या एका न्यूज पेपरच्या बातमीवर मस्क यांनी ही पोस्ट केली आहे.

Government employees will get 26 public holidays in the new year.

  नवीन वर्षात मिळणार शासकीय कर्मचाऱ्यांना 26 सार्वजनिक सुट्ट्या.... 2025 साली महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना 26 सार्वजन...